

Ashwin Blames IPL After India's Series Loss:
esakal
Ashwin Blames IPL After India's Series Loss: भारत आणि आयर्लंड(IND vs IRE) यांच्यातील दोन सामन्यांची टी-20 मालिका भारतीय संघासाठी अत्यंत निराशाजनक ठरली. या मालिकेत भारतीय संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. आयर्लंडने दमदार खेळ करत भारताचा २-० असा धुव्वा उडवला.
विशेष म्हणजे, इतिहासात प्रथमच आयर्लंडने भारताविरुद्ध टी-20 मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. पहिल्या सामन्यात भारताला ३४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला, तर दुसऱ्या सामन्यातही टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. या लाजिरवाण्या पराभवानंतर भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन भारतीय संघावर चांगलाच भडकला.