

IND Wvs SA W T20I
sakal
जोहान्सबर्ग : टी-२० मालिका गमावण्याची नामुष्की ओढवल्यानंतर भारताच्या महिला क्रिकेट संघाने शनिवारी मध्यरात्री झालेल्या चौथ्या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकन संघावर १४ धावांनी विजय साकारला. पहिल्या तीन सामन्यांत निराशाजनक कामगिरी करणारी दीप्ती शर्मा (नाबाद ३६ धावा, ५/१९) हीच भारतीय संघाच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरली. तिचीच प्लेयर ऑफ दी मॅच म्हणून निवड करण्यात आली. भारताचा या टी-२० मालिकेतील पहिलाच विजय होय. आता दक्षिण आफ्रिकन संघाकडे ३-१ अशी आघाडी आहे.