
भारतीय क्रिकेट संघाने ओव्हल कसोटीत इंग्लंडवर शानदार विजय मिळवत कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत आणली. या विजयाचा खरा हिरो ठरला भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज. त्याने पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ५ बळी घेत इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडले. शेवटच्या दिवशी इंग्लंडला ३५ धावांची गरज असताना सिराजने ३ बळी घेत सामना भारताच्या बाजूने फिरवला. या मालिकेत त्याने सर्वाधिक १८५.३ षटके टाकली आणि १११३ चेंडूत २३ बळी घेतले. सिराजच्या या कामगिरीने तो केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे.