
इंदूर, ता. २० (पीटीआय) ः महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याची जबाबदारी उपकर्णधार स्मृती मानधनाने स्वतःवर घेतली. चुकीचा फटका मी मारला आणि तेथूनच भारतीय संघाची घसरण सुरू झाली, अशी निराशा स्मृतीने व्यक्त केली.