
लंडन : पहिल्या कसोटीत मोठ्या पराभवाचा सामना केल्यानंतर बर्मिंगहॅम येथील दुसऱ्या कसोटीत आम्ही उलटवार केला आणि दणदणीत विजय मिळवला होता. फलंदाजी आणि गोलंदाजीत एकाच वेळी अचूक कामगिरी केली तर इंग्लंडला पराभूत करता येऊ शकते, हा विश्वास आम्हाला तेथेच मिळाला, असे मत भारतीय कर्णधार शुभमन गिल याने व्यक्त केले.