ऑलिंपिकमधील सर्वोत्तम कामगिरीची गोपीचंदना आशा

मार्गदर्शक पुल्लेला गोपीचंद पी व्ही सिंधूस मार्गदर्शन करताना
मार्गदर्शक पुल्लेला गोपीचंद पी व्ही सिंधूस मार्गदर्शन करताना
Updated on

नवी दिल्ली : टोक्‍यो ऑलिंपिकमधील भारतीय बॅडमिंटन संघात यंदा जगज्जेती असणार आहे, त्यामुळे या स्पर्धेत भारताची सर्वोत्तम कामगिरी होईल, अशी अपेक्षा राष्ट्रीय मार्गदर्शक पुल्लेला गोपीचंद यांनी व्यक्त केली.

भारतीय बॅडमिंटनपटूंनी सलग दोन ऑलिंपिक स्पर्धेत पदक जिंकले आहे. 2012 च्या लंडन स्पर्धेत साईना नेहवालने ब्रॉंझ जिंकले होते, तर 2016 च्या स्पर्धेत सिंधूने रौप्यपदक पटकावले होते. यंदा होणाऱ्या टोक्‍यो स्पर्धेत गोपीचंद यांना जास्त चांगल्या कामगिरीची आशा आहे. "ऑलिंपिक स्पर्धेत आपली कामगिरी सातत्याने उंचावत आहे. यावेळी तर जगज्जेती आपल्या संघात असेल. चांगली पूर्वतयारीही होणार आहे. त्यामुळे गेल्या दोन स्पर्धांपेक्षा चांगल्या कामगिरीची नक्कीच आशा आहे,' असे गोपीचंद यांनी सांगितले.

"खेलो इंडिया' निमित्ताने आयोजित कार्यक्रमात गोपीचंद यांनी हे मत व्यक्त केले. ते म्हणाले, गुणवत्तेचा शोध घेताना बॅडमिंटनच्या खेळाचे स्वरूप लक्षात घेतो. हा तंदुरुस्तीचा कस पाहतो, तसेच कौशल्याचाही. त्यामुळे शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती सारखीच महत्त्वाची असते. नवोदितांचा अभ्यास करताना ते उच्च स्तरावरील स्पर्धेस किती सामोरे जाऊ शकतात, याकडे लक्ष देतो, असेही त्यांनी सांगितले. खेलो इंडिया स्पर्धा 10 ते 22 जानेवारीदरम्यान गुवाहाटीत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com