

India vs SA World Cup:
esakal
मँचेस्ट: भारतीय महिला क्रिकेट संघाला रविवारी दक्षिण आफ्रिकन संघाकडून हार पत्करावी लागली. यामुळे आता टी-२० विश्वकरंडकात उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मार्ग खडतर बनला आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने पराभवाचे खापर सुमार क्षेत्ररक्षणावर फोडले. भारतीय खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात सुमार कामगिरी केली. झेल सोडले. याचा फटका आम्हाला बसला, असे स्पष्ट अन् परखड मत तिने याप्रसंगी व्यक्त केले.