IND vs SL: टीम इंडियाला मोठा धक्का! रात्री उशिरा 'या' दिग्गजाची बिघडली तब्येत

मालिकेतील शेवटच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का...
ind vs sl rahul dravid not travel with team india
ind vs sl rahul dravid not travel with team india

India vs Sri lanka : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना 4 विकेटने जिंकला. मालिकेतील शेवटचा सामना 15 जानेवारीला तिरुअनंतपुरम येथे खेळल्या जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. अचानक संघातील एका महत्त्वाच्या सदस्याची तब्येत बिघडली, त्यामुळे हा दिग्गज कोलकाताहून आपल्या घरी परतला असून तो शेवटच्या सामन्यात संघासोबत दिसणार नाही.(rahul dravid not travel with team india)

ind vs sl rahul dravid not travel with team india
IND vs SL: 'डावखुरा फलंदाज टॉप ऑर्डरमध्ये नसल्यामुळे...'; मालिका जिंकल्यानंतर रोहितचे मोठे वक्तव्य

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड प्रकृती खालावल्याने कोलकाताहून बंगळुरू येथील त्यांच्या घरी परतले आहेत. मालिकेच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी द्रविडला हॉटेलमध्येच अस्वस्थ वाटत होते. त्याचा रक्तदाब वाढला होता. औषध सेवन केल्यानंतर तो कोलकात्याच्या सामन्यादरम्यान थांबला होता. बंगाल क्रिकेट बोर्डाने द्रविडसाठी डॉक्टर उपलब्ध करून दिला होता. अशा परिस्थितीत तो तिरुअनंतपुरममध्ये तिसऱ्या वनडेत भारतीय संघासोबत दिसणार नसल्याचे मानले जात आहे.

ind vs sl rahul dravid not travel with team india
IND vs SL: कुलदीप यादव शेवटच्या ODI सामन्यातून बाहेर! 'या' कारणावरून पडला प्रश्न

या मालिकेदरम्यान राहुल द्रविडने संघातील खेळाडूंसोबत आपला 50 वा वाढदिवस साजरा केला. राहुल द्रविडने 1996 मध्ये टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण केले. राहुल द्रविडने टीम इंडियासाठी 164 कसोटी सामन्यांमध्ये 13288 धावा केल्या आहेत, ज्यात 36 शतके आणि 63 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने 344 एकदिवसीय सामन्यांमध्ये 10889 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 12 शतके झळकावली आहेत. त्याने भारतासाठी 1 टी-20 सामनाही खेळला आहे. आता तो भारतीय संघासोबत अनेक वर्षांपासून प्रशिक्षक म्हणून काम करत आहे.

ind vs sl rahul dravid not travel with team india
IND vs SL: कुलदीप यादव शेवटच्या ODI सामन्यातून बाहेर! 'या' कारणावरून पडला प्रश्न

मालिकेतील दुसऱ्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी केली. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करताना श्रीलंकेच्या संघाला 215 धावांत गारद केले होते. टीम इंडियाने हे लक्ष्य 6 विकेट्स गमावूनच गाठले. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक 64 धावा केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com