
नवी दिल्ली : भारतीय नेमबाजांचे आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील घवघवीत यश गुरुवारीही कायम राहिले. भारताच्या युवा नेमबाजांनी चार सुवर्णपदकांची कमाई केली. आता भारतीय खेळाडूंनी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत १४ सुवर्ण, सहा रौप्य व सहा ब्राँझ अशी एकूण २६ पदकांची कमाई केली आहे. पदकतालिकेत भारतीय संघ पहिल्या स्थानावर कायम आहे.