India vs Bangladesh 1st ODI 2022 : बांगलादेशने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. बांगलादेश 1 विकेटने रोमांचक असा हा सामना जिंकला. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल यांच्या सोबत भारतीय संघाला मोहिमेची विजयी सुरुवात करता आली नाही.
खरं तर टी-20 वर्ल्ड कपनंतर तिन्ही स्टार्सना न्यूझीलंड दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली होती. या तिघांनीही बांगलादेश दौऱ्यावर पुनरागमन केले आहे. मात्र राहुलशिवाय एकाही फलंदाजाला धावा करता आल्या नाही आणि पहिल्याच सामन्यात भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. एकेकाळी भारताने सामन्यात पुनरागमन केले असले तरी 3 चुकांमुळे तो सामना गमावला.
भारताच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे भारताची खराब फलंदाजी, ज्यामुळे भारत यजमानांसमोर मोठे लक्ष्य ठेवता आले नाही. राहुलशिवाय एकाही फलंदाजाला आजच्या सामन्यात चालला नाही. शिखर धवन 7, रोहित शर्मा 27 आणि कोहली केवळ 9 धावा करू शकले. खराब फलंदाजीमुळे भारताला पूर्ण षटकेही खेळता आली नाहीत.
भारताच्या पराभवाचे कारण भारताच्या तोंडावरचा विजय हिसकावून घेणारा मेहदी हसन मिराज आहे. मिराज 38 धावांवर नाबाद राहिला. भारताला एकवेळ जिंकण्यासाठी फक्त एका विकेटची गरज होती, पण मिराजने शेवटपर्यंत उभे राहून बांगलादेशला विजय मिळवून दिला. भारतीय गोलंदाजांना मिराज आणि रहमानची जोडी फोडता आली नाही. दोघांमध्ये 51 धावांची अखंड भागीदारी झाली.
42 षटकांनंतर बांगलादेशला विजयासाठी 48 चेंडूत 32 धावांची गरज होती. भारताचा विजय दिसत होता, पण चहरच्या 44व्या षटकाने भारताच्या हातातून सामना काढून घेतला. चहरने त्याच्या षटकात 15 धावा दिल्या. या षटकानंतर बांगलादेशला 36 चेंडूत अवघ्या 14 धावांची गरज होती, जी त्यांनी सहज पूर्ण केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.