

Cheteshwar Pujara on Ravindra Jadeja
esakal
नवी दिल्ली: रवींद्र जडेजा सुरुवातीला बचावात्मक गोलंदाज होता; परंतु त्याने मानसिकता बदलली आणि तो आक्रमक शैलीचा गोलंदाज झाला. यामुळेच तो कसोटी क्रिकेटमध्ये परिपूर्ण गोलंदाज झाला आहे, असे मत माजी फलंदाज चेतेश्वर पुजाराने व्यक्त केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजा हा भारताचा प्रमुख फिरकी गोलंदाज असून तो मॅचविनरही ठरत आहे.