Rishabh Pant : टीम इंडियातून ऋषभ पंत 'बाहेर' अन् भारतीय खेळाडूंना माहित नाही कारण

पाकिस्तानविरुद्ध सामन्यात ऋषभ पंत प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल अशी अपेक्षा होती पण...
ravindra jadeja on rishabh pant out to team india vs pakistan match asia cup 2022 sports cricket kgm00
ravindra jadeja on rishabh pant out to team india vs pakistan match asia cup 2022 sports cricket kgm00

Rishabh Pant Asia Cup 2022 : आशिया कप 2022 भारताने पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला, ज्याची सुरुवात दणदणीत विजयाने झाली. 28 ऑगस्ट रोजी दुबईत खेळवण्यात आलेला सामना टीम इंडियाने 5 विकेटने जिंकला होता. या सामन्यात ऋषभ पंत प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल अशी अपेक्षा होती. पण संघाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा झाली तेव्हा त्यात पंतचे नाव नव्हते. त्याच्या जागी दिनेश कार्तिक खेळताना दिसला. ऋषभ पंत प्लेइंग इलेव्हनमधून का बाहेर आहे, असा प्रश्न उपस्थित झाला. तो जखमी नाही तरी त्याला संघातून वगळण्यात आले आहे? असाच प्रश्न टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाला पत्रकारांनी पत्रकार परिषदेत विचारला.

ravindra jadeja on rishabh pant out to team india vs pakistan match asia cup 2022 sports cricket kgm00
रवींद्र जडेजा झाला भावुक," माझ्या मृत्यूच्या देखील अफवा पसरवल्या पण..."

पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने पंतला सामन्यात का संघात घेतल नाही असा प्रश्न विचारला. यावर जडेजा म्हणाला, मला हे अजिबात माहित नाही. हा माझ्या पुस्तकाबाहेरचा प्रश्न आहे. जडेजाने हसत हसत हे उत्तर दिले, ज्यावर उपस्थित सर्वजण हसले. पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर आता भारतीय संघाला अ गटातील दुसरा सामना हाँगकाँगविरुद्ध खेळणार आहे. या सामन्याबाबत जडेजा म्हणाला की, टी-20 फॉरमॅट खूपच लहान आहे. यामध्ये कोणत्याही संघाला हलके घेऊ नये. भारतीय संघ या सामन्यात हाँगकाँगला हलक्यात घेणार नाही.

ravindra jadeja on rishabh pant out to team india vs pakistan match asia cup 2022 sports cricket kgm00
IND vs HK : चार वर्षांपूर्वी हाँगकाँगने भारताला दिली होती कडवी टक्कर; विराटकडून मोठ्या अपेक्षा

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली आणि पाकिस्तानला 19.5 षटकात 147 धावांवर बाद केले आणि त्यानंतर 19.4 षटकात 5 विकेट्स घेत लक्ष्य गाठले. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारने चार, हार्दिक पांड्याने तीन बळी घेतले, तर फलंदाजीत विराट कोहली (35), रवींद्र जडेजा (35) आणि हार्दिक पांड्या (33) यांनी शानदार खेळी केली. पंड्याला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com