‘ट्रॉफी’चा भारतातील प्रवास १७ ऑगस्टपासून

‘ट्रॉफी’चा भारतातील प्रवास १७ ऑगस्टपासून
Updated on

नवी दिल्ली - भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या संघास दिल्या जाणारी ‘ट्रॉफी’ पुढील आठवड्यात भारतात आणण्यात येणार असून, देशातील तिच्या प्रवासास १७ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथून होईल.

विश्‍वकरंडक स्पर्धेची ‘ट्रॉफी’ स्पर्धा होणाऱ्या सहा केंद्रांचा प्रवास करणार आहे. १७ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर अशा एकूण ४० दिवसांच्या प्रवासात एकूण ९ हजार कि.मी. अंतराचा प्रवास केला जाईल. 

यजमान भारत आपले सामने नवी दिल्ली येथे खेळणार असून, येथूनच या ट्रॉफीच्या प्रवासास सुरवात होईल. ‘ट्रॉफी’ प्रवासाबाबत बोलताना संयोजन समितीचे आणि भारतीय फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले, ‘‘या ट्रॉफीच्या प्रवासाचा अनुभव वेगळाच असेल. स्पर्धेच्या प्रचारासाठीचा हा अखेरचा टप्पा असून, तो सर्वांत महत्वाचा असेल. त्यामुळे देशातील फुटबॉल चाहत्यांना विश्‍वकरंडक ट्रॉफी जवळून बघता येणार आहे. त्यामुळे चाहत्यांना या वेळी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा.’’ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com