Child Marriage : बालविवाह रोखणाऱ्या रणरागिणी

मुलींच्या शिक्षणाविषयी पालकांमध्ये जागृती वाढली, तरी जबाबदारीतून मुक्त होण्याच्या नावाखाली बालविवाहांचे प्रमाण आजही कायम आहे. बालविवाह प्रतिबंधक कायद्याविषयी समाजात हळूहळू जनजागृती वाढत आहे.
aishwarya shewale and laxmi dasarwar two women fight against child marriage
aishwarya shewale and laxmi dasarwar two women fight against child marriage Sakal

किनवट : मुलींच्या शिक्षणाविषयी पालकांमध्ये जागृती वाढली, तरी जबाबदारीतून मुक्त होण्याच्या नावाखाली बालविवाहांचे प्रमाण आजही कायम आहे. बालविवाह प्रतिबंधक कायद्याविषयी समाजात हळूहळू जनजागृती वाढत आहे.

मुलीचे लग्न ठरविताना जरा वयाचाही विचार करावा, असे म्हणण्याची वेळ आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांवर आली आहे. त्यामुळे आदिवासी किनवट तालुक्यात नुकतीच बालविवाहाची धक्कादायक घटना घडली.

ता. २८ फेब्रुवारीला घोटी येथील शिवाजी राजे गार्डनमध्ये सकाळी दहाला विवाह होणार असल्याची माहिती एका तरुण सामाजिक कार्यकर्त्याला मिळाली. परंतु, वधूचे वय कमी असल्याचे तरुणाच्या लक्षात आले. त्यांनी १०९८ चाइल्डलाइफ सेंटरला कॉल करून इत्यंभूत माहिती दिली.

चाइल्डलाइफ सेंटरच्या पर्यवेक्षिका ऐश्वर्या दिनकर शेवाळे, प्रकल्प पर्यवेक्षिका रेखा गुलसकर व केस वर्कर दीपाली दत्ता हिंगोले यांनी किनवट पोलिस स्टेशनला तत्काळ संपर्क साधून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची विनंती केली.

नांदेडला जिल्ह्याच्या ठिकाणी त्या राहात असल्याकारणाने त्यांना किनवटला पोचण्यासाठी उशीर होणार होता, हे लक्षात आल्याने त्यांनी किनवट शहरातील अंगणवाडी सेविका लक्ष्मी रमेश दासरवार, मोसीन आमदन चाऊस, प्रेमिला पांडुरंग हटकर, नंदा देवराव येमुलवार यांना घटनास्थळी जाऊन बालविवाह रोखण्याचे निर्देश दिले. जिल्हा बालसंरक्षण अधिकारी विद्या आळणे समन्वय साधत होत्या.

धोका पत्कारून केली हिंमत

एकीकडे लग्नाची सर्व तयारी सुरू असताना पोलिस आणि अंगणवाडी सेविकांना पाहून वऱ्हाडी मंडळी अवाक् झाले. मुलगी १० वीत असून १६ वर्षांची अल्पवयीन असल्याची त्यांनी दोन्ही कुटुंबीयांना माहिती दिली आणि हे लग्न बेकायदेशीर असल्याने थांबविण्याची विनंती केली. विवाह रोखल्यामुळे त्यांच्या जिवाचा धोका पत्करावा लागला.

हा धोका पत्करून त्यांनी बालविवाह रोखण्याचे अग्निदिव्य काम केले. चाइल्डलाइफ सेंटरच्या पर्यवेक्षिका ऐश्वर्या शेवाळे व केस वर्कर दीपाली इंगोले यांनी सप्टेंबर ते फेब्रुवारी या ६ महिन्यांत १२ बालविवाह रोखले आहेत. खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्या कार्याला सलाम...!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com