Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

पितृदोष का निर्माण होतो ?
Akshaya Tritiya 2024
Akshaya Tritiya 2024ESAKAL

Akshaya Tritiya 2024 :

हिंदू धर्मात वर्षात येणाऱ्या साडेतीन मुहूर्तांना अधिक महत्त्व आहे. त्यापैकीच एक असलेला अक्षय्य तृतीयेच्या दिवशीही अनेक शुभ गोष्टी घडतात. केवळ सोने खरेदी नाहीतर या दिवशी काही उपाय केल्यानेही जीवनातील अनेक अडचणी दूर होतात.

काहीवेळा संकटांचा फेरा सुटत नसतो. घरात सतत अडचणी येतात. तेव्हा ज्योतिषांकडे कुंडली दाखवले जाते. जेव्हा पितृदोष कुंडलीत असतो तेव्हा अनेक अडथळे येत असतात. कोणत्याही नव्या कामाला यश येत नाही. त्यामुळे, लोक तणावग्रस्त असतात. (Pitrudosh)

Akshaya Tritiya 2024
Pitra Dosh: पितृदोष म्हणजे काय? का लागतो पितृदोष जाणून घ्या कारणे आणि उपाय

अशा परिस्थितीत ज्योतिषशास्त्रात पितृदोषाची शांती करण्यास सांगितले जाते. काहीवेळा पितृदोषाची तिव्रता कमी असते तेव्हा पितरांसाठी काही उपाय केल्याने घरात शांती पसरते. तुम्हीही पितृदोषातून मुक्त होण्यासाठी काही उपाय करणार असाल तर अक्षय्य तृतीयेदिवशी तुम्ही हे काम करू शकता.

Akshaya Tritiya 2024
Pitru Paksha 2022: पितृपक्षात 'या' गोष्टी चुकूनही करू नका, नाही तर लागु शकतो पितृदोष

पितृदोष का निर्माण होतो

ज्या व्यक्तीचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो. दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्ध विधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात. तुम्ही तुमच्या पितरांचे योग्य प्रकारे अंत्यसंस्कार आणि श्राद्ध न केल्याने सुध्दा तुम्हाला पितृ दोष लागू शकतो.

घरावर ठेवा हे ताट

अक्षय्य तृतीयेदिवशी प्रत्येकाच्या घरी गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. त्यावेळी पितरांसाठी एका प्लेटमध्ये गोडाचे पदार्थ घेऊन घरावर ठेवावे. सोबत पाणीही ठेवावे. उन्हाने कासाविस झालेले पक्षी तो नैवेद्य खातील तेव्हा त्यांचा आत्मा तृत्प होईल, तोच तुमचे पितरही शांत होतील.  

Akshaya Tritiya 2024
पितृदोष दूर करण्याचा हा आहे रामबाण उपाय

पिंपळाच्या झाडाचा उपाय

ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष असेल त्यांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सकाळी उठून एखाद्या स्वच्छ ठिकाणी किंवा मंदिरात लावलेल्या पिंपळाच्या झाडावर पितरांसाठी घरातील मिठाई आणि शुद्ध पाणी भांड्यात ठेवावे. त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली अगरबत्ती लावा आणि आपल्या पूर्वजांच्या समाधानासाठी प्रार्थना करा.

यानंतर, मागे न पाहता थेट आपल्या घरी परत या. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर असे केल्याने पितृदोषापासून लवकर सुटका होते, असे मानले जाते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com