
शलाका तांबे - लेखिका, लाइफ कोच, समुपदेशक
आजच्या या वेगवान जगात, वर्क-लाइफ बॅलन्स म्हणजे काम आणि वैयक्तिक आयुष्य यांचे संतुलन सांभाळणे प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक झाले आहे. हे संतुलन ठेवणे आव्हानात्मक असते, याचा अनुभव आपण सगळे घेतो. खासकरून स्त्रियांच्या दृष्टिकोनातून बघितले, तर वर्क-लाइफ बॅलन्स हे त्यांना अधिक कुशलतेने सांभाळावे लागते ही वस्तुस्थिती आहे. मग आज आपण या विषयाकडे, खास स्त्रियांच्या दृष्टिकोनातून बघूयात.