

Ayurvedic Remedies for Fever
sakal
आज संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रचंड प्रमाणात पाऊस झाला असून अनेक ठिकाणी पूरग्रस्त स्थिती निर्मीण झाली आहे. यासोबतच वातावरण थंड असल्याने बऱ्याच जणांना सर्दी-खोकला किंवा ताप अशा समस्या उद्भवू शकतात. पण याचमुळे अंगदुखी, थकवा अशक्तपणा आणि भूक न लागणे असा त्रास होऊ शकतो. या सगळ्यात ताप शरीराची संसर्गाशी लढण्याची नैसर्गिक प्रक्रिया असली तरी, जर ताप वाढला, तर योग्य उपचार घेणं आवश्यक असतं. आयुर्वेदानुसार तापाला ज्वर म्हटलं जातं. आपल्या शरीरातील दोषांचं संतुलन बिघडल्याने किंवा संसर्गामुळे ताप येऊ शकतो. आयुर्वेदात यावर उत्तम आणि प्रभावी घरगुती उपाय सांगितले आहेत.