- सायली शिंदे, योगतज्ज्ञ
पस्तिशीचा टप्पा पार केल्यावर स्त्रियांच्या शरीरात अनेक जैविक व मानसिक बदल घडू लागतात. कुटुंब, करिअर, जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःकडे लक्ष द्यायला त्या विसरतात; पण याच काळात स्त्रियांच्या आरोग्याचा पाया डळमळू लागतो. म्हणूनच स्वतःकडे बघणे हा ‘स्वार्थ’ नसून ‘स्वसंवर्धन’ आहे.