
Monsoon Skin Care: पावसाळ्यात बॅक्टेरिया आणि संसर्गाचे प्रमाण वाढते. या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. या दिवसामध्ये त्वचेसंबंधित अनेक आजार उद्भवतात. जसे की खाज सुटणे, पुरळ येणे यासारख्या समस्यापासून आराम हवा असेल तर पुढील घरगुती उपाय करू शकता.
त्वचेसंबंधित कोणतेही समस्या असेल किंवा चमकदार त्वचा हवी असेल तर कोरफडचा वापर केला जातो. कोरफड त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर ठेवतो. जर पावसाळ्यात तुम्हाला अॅलर्जी जाली असेल तर कोरफड जेल लावू शकता. असे दिवसातून २ ते ३ वेळा करावे.
कडूलिंबाचे तेल, पान, बिया अनेक समस्यांवर रामबाण उपाय आङहेत. तसेच त्वचेची जळजळ किंवा अॅलर्जी कमी करण्यासाठी देखील याचा वापर करू शकता. यामध्ये जीवाणूविरोधी गुणधर्म असतात. जे हानिकारक जीवाणू आणि बुरशीशी लढण्यास मदत करतात. तसेच कडूलिंबाचे तेल किंवा पेस्ट त्वचेवर १० ते १५ मिनिटे लावल्यास आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुतल्यास समस्येपासून आराम मिळतो.
खोबरेल तेल नैसर्गिकरित्या दाहक -विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्मांनी सृद्ध आहे. त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी आणि अॅलर्जीच्या समस्या कमी करण्यासाठी हा खुप प्रभावी मार्ग आहे.जर पावसाळ्यात तुम्हाला अॅलर्जी, खाज सुटत असेल किंवा पुरळ येत असेल तर खोबरेल तेलाचा वापर करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.