

Cruelty Free Rangapanchami Celebrations: भारतामध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन आणि त्यानंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रंग, संगीत आणि आनंद यामध्ये आपण रमून जातो. पण या सगळ्या गडबडीत अनेकदा आपल्या आजूबाजूला असलेल्या पाळीव तसेच भटक्या प्राण्यांकडे दुर्लक्ष होते.
रासायनिक रंग आणि मोठा आवाज प्राण्यांसाठी खूप त्रासदायक ठरू शकतो. माणसांपेक्षाही जास्त धोका प्राण्यांना या रंगांपासून असतो. त्यामुळे रंगपंचमी साजरी करताना त्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.