

राजीव तांबे - साहित्यिक, बालमानसविषयक तज्ज्ञ
‘चांगले शिक्षक’ निवडण्याच्या एका कमिटीत मी होतो. शंभर शाळांतून चांगले शिक्षक निवडायचे होते आणि तेही त्या शाळेला आणि त्या शिक्षकांना न समजता. खूपच कठीण काम होतं ते. कमिटीत आम्ही दहा जण होतो आणि प्रत्येकाला दहा-दहा शाळा वाटून दिल्या होत्या. ‘चांगल्या शिक्षकाबाबत दहा जणांची वेगवगेळी ५१ मतं होती. निवड प्रक्रियेबाबत गुप्तता बाळगायची असल्याने आणि प्रक्रियेत समानता असणे आवश्यक असल्यानं शाळेत पाहणी करणं म्हणजे अंधाऱ्या खोलीत काळी सुई शोधण्यासारखं झालं असतं.