पावसाळ्यात आलं जास्त दिवस टिकण्यासाठी काय कराव? घ्या जाणून

आलं पावसात भिजल्यामुळे सडतं आणि खराब होतं. बऱ्याचदा अशा आल्यावर बुरशी जमा होते. यासाठीच
how to store fresh ginger in rainy season
how to store fresh ginger in rainy season how to store fresh ginger in rainy season
Updated on

पावसाळा सुरु झाला की अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अगदी तब्येतीपासून ते फ्रिजमधील भाज्यांपर्यंत. याच भाज्यांमध्ये विशेष काळजी घ्यावी लागते ती म्हणजे आल्याची. कारण आलं खराब होण्याची शक्यता जास्त असते. आलं पावसात भिजल्यामुळे सडतं आणि खराब होतं. बऱ्याचदा अशा आल्यावर बुरशी जमा होते. यासाठीच पावसाच्या दिवसांमध्ये आलं टिकवणं म्हणजे मोठं काम. तर जाणून घेऊयात पावसाळ्यात आलं जास्त दिवस टिकण्यासाठी काय कराव?(how to store fresh ginger in rainy season)

पावसात आल्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. आलं हे बहुगूणी आहे. चहाच काय पावसात अनेक पदार्थांमध्ये अगदी सर्दी खोकल्याच्या काढ्यातही आल्याचा वापर केला जातो.

how to store fresh ginger in rainy season
Kitchen Tips: स्टफिंग पराठा बनवताना सारण बाहेर निघतं का? फॉलो करा 'या' टिप्स

तर पावसाळ्या आलं जास्त दिवस कसं टिकवाल

  • आलं बाजारातून आणल्यावर पाण्यामध्ये धुवून स्वच्छ करा. ज्यामुळे त्याला लागलेला चिखल अथवा माती निघून जाईल.

  • त्यानंतर एका सुती कापडावर आलं सुकवा. त्यामुळं काही दिवस आलं टिकवू शकता.

  • आल्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून तुम्ही आलं फ्रीजमध्ये काही दिवस टिकवून ठेवू शकता.

how to store fresh ginger in rainy season
Kitchen Tips : टिपिकल पदार्थांना अधिक स्वादिष्ट बनवायचंय तर या गोष्टी नक्की करा, जेवणाच्या टेबलावर होईल तुमचंच कौतुक
  • जर आलं खुप ओलंसर असेल तर त्याच्या साल काढून त्याचे काप करा अन् फ्रिजमध्ये ठेवा.

  • उन्हाळ्यात आलं सुकवून त्याची पावडर करून ती देखील तुम्ही पावसाळ्यात चहा अथवा स्वयंपाकात वापरू शकता.

  • भिजलेल्या आल्याची चव कमी होते त्यामुळे आलं सुकवून वापरणं जास्त फायदेशीर ठरतं.

how to store fresh ginger in rainy season
Kitchen Tips : स्वयंपाक बनवायला जातो खूप वेळ, 'या' ट्रिक्स वापराल तर मिनिटात होईल जेवण

आल्याचे फायदे

कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी आल्याचं सेवन महत्त्वपूर्ण ठरतं.

कच्च्या आल्याचे सेवन केल्याने पचनक्रियाही निरोगी ठेवता येते.

आल्याचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय ठरू शकते. आले खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी होते.

महिलांना मासिक पाळीदरम्यान खूप पोटदुखी होते. अशावेळी आल्याचे सेवन करावे.

आलं खाल्ल्याने तणाव कमी होतो परिणामी मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.