

मुक्ता पंडित
शेतीच्या अनुषंगाने आपल्याकडे खोल संशोधन होत नाही. त्यामुळे आजही अनेकदा आपण पारंपरिक पद्धतीने शेती करण्यावर भर देतो. काही शेतकरी नवनवीन प्रयोग करत आहेत. मात्र त्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे शेतीत नवतंत्रज्ञान आणि संशोधन काहीसे मागे आहे. त्यात सेंद्रिय शेतीकडे करणाऱ्यांचे प्रमाण देखील कमी. जर्मनीत मी या विषयावर आठ वर्षे संशोधन केले. तिथून भारतात परत असल्यानंतर जाणवले, की येथील अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे विपणनदेखील करता येत नाही.