मानसिक आरोग्यासाठी कौटुंबिक सहवास उपयुक्त

कुटुंब म्हटले, की सुख आणि दुःख आपण एकत्र अनुभवतो
Neha Joshi over Family association is helpful for mental health
Neha Joshi over Family association is helpful for mental healthsakal
Summary

कुटुंब म्हटले, की सुख आणि दुःख आपण एकत्र अनुभवतो

- नेहा जोशी

मला असे मनोमन वाटते, की कुटुंबव्यवस्था संवादावर अवलंबून असते. संवादाने अगदी आपण खूप मोठी समस्याही सोडवू शकतो. कुटुंब म्हटले, की सुख आणि दुःख आपण एकत्र अनुभवतो. घरातली माणसे म्हटले, की त्यांचा वेगवेगळा स्वभाव, रुसवेफुगवे व नाती टिकून ठेवण्यासाठी

संघर्ष या गोष्टी येतातच; पण संवाद खूप महत्त्वाचा आहे. आपले विचार मांडणे व समोरच्याचे मत जाणून घेणे, खूप महत्त्वाचे असते; कारण त्यामुळे आपल्याला समोरच्या व्यक्तीबद्दल खूप जाणून घेता येते.

आईसोबत माझे खूप वेगळ नातं आहे. ती माझ्या आयुष्यात फक्त आई म्हणून नाही, तर मैत्रीण व मोठी बहीण असे सगळे रोल प्ले करते आणि ती खूप मस्त आहे. खूप दृढ नाते आहे आमच्यामध्ये.

तिचा सर्वांत छान गुण म्हणजे सर्वांना सोबत ठेवून नाती जपते. हे सगळे करताना तिला केव्हा केव्हा त्रासही होतो; पण कुटुंब नेहमी एकत्र राहावे, असे तिचे कायम प्रयत्न असतात. वाईट व चांगल्या क्षणी ती मदतीला सगळ्यांसाठी पुढे असते.

मला तिचा खूप अभिमान आहे. सर्वांत आवडता प्रसंग मी सांगू इच्छिते. जेव्हा ती ५६ वर्षांची होती, तेव्हा तिने कथकचे प्रशिक्षण घ्याला सुरवात केली, खूप आधीपासून तिची ही इच्छा होती. तिने बऱ्याच नाटकांत व चित्रपटात कामे केली आहेत.

आणि लग्न झाल्यानंतर घर, कुटुंब आणि आम्हा मुलांना तिने खूप छान सांभाळले. हे सगळे करण्यात तिची जी इच्छा होती, ती पूर्ण झाली नाही; पण जेव्हा तिला वाटले, की आता माझी मुले सेटल झाली आहेत आणि माझ्याकडे वेळ आहे, तर तिने कथकचे पूर्ण प्रशिक्षण घेतले.

एकदा तिचा नाशिकमध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने डान्स परफॉर्मन्स होता आणि मी तिला सरप्राइज देणार होते; पण तिनेच मला तिच्या एवढ्या सुंदर परफॉर्मन्सने सरप्राईझ दिले.

आमच्या कुटुंबाचे एक वैशिष्ट्य हे आहे, की आम्ही एकमेकांना खूप समजून घेतो. आधीपासूनच मी आणि माझे आई-वडील व भाऊ एकमेकांना खूप सपोर्ट करतो. आजपर्यंत मी आणि माझ्या भावाने करिअरबाबत जेवढे निर्णय घेतले, त्या सगळ्यांना आई-वडिलांनी खूप सपोर्ट केला.

आम्ही सर्व कुटुंबीय एकमेकांच्या खूप जवळ आहोत आणि नेहमी वेगवेगळ्या प्रसंगांच्या निमित्ताने एकत्र येत असतो. आमचा वाडा आहे नाशिकमध्ये. सगळे नातेवाईक आणि आम्ही भावंडे सण-उत्सवांच्या निमित्ताने भेटतो आणि खूप खेळीमेळीच्या वातावरणात, उत्साहात आमचा सगळा वेळ जातो.

माझ्या कामाच्या व्यापामुळे मला खूप कमी सहवास मिळतो; पण जेव्हा मला घरी जाण्याची संधी भेटते, तेव्हा मी घरी जायला खूप उत्सुक असते. सध्या मी ‘ॲण्ड टीव्ही’वर ‘दुसरी माँ’ या मालिकेत यशोदाची भूमिका साकारत आहे. या मालिकेचे चित्रीकरण जयपूरमध्ये सुरू आहे. त्यामुळे मला घराची खूप आठवण येते.

काळजी घेणारे आपले आई-वडील जेव्हा जवळ नसतात, तेव्हा कुटुंबाचे महत्त्व लक्षात येते. मला आवर्जून सांगावेसे वाटते, की चांगल्या कौटुंबिक सहवासामुळे आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुदृढ राहते व आपल्या आयुष्यात स्थिरता असते. आपले कुटुंब आपल्यासाठी आहे, ही कल्पनाच खूप आनंददायी असते. कुटुंबामध्ये सुसंवाद असणे फार गरजेचे आहे. एकमेकांचे विचार ऐकून घेणे, काही समस्या असेल तर त्यातून मार्ग काढणे या सगळ्या गोष्टींमुळे नाती घट्ट होतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com