- शलाका तांबे, लेखिका, लाइफ कोच, समुपदेशक
चिंता कोणाला नसते? कमी-जास्त प्रमाणात चिंता सगळ्यांच्याच आयुष्यात निर्माण होत असते. पूर्णपणे चिंतामुक्त होण्यासाठी खूप धैर्य लागतं, आणि स्वतःवर व स्वतःच्या मनावर खूप काम करायला लागतं आणि त्यासाठी मनाचा नियमित अभ्यासही लागतो. हे सगळ्यांना जमेल असं नाही.