‘पावसाळा’ हा पालकांसाठी त्रासदायक आणि मुलांसाठी आल्हाददायक असतो’, याच्याशी तुम्ही नक्कीच सहमत व्हाल आणि दिवस-रात्र पडणारा मुसळधार पाऊस ही पालकांसाठी डोकेदुखी आणि मुलांसाठी पर्वणी असते. कारण शाळेला सुट्टी तर मिळू शकतेच; पण पावसाचा वेढा पडल्यानं पालक आणि मुलं घरात कैद होतात. अशावेळी नेमकं काय करावं, हे मुलांना बरोबर माहीत असतं. बिचारे पालक मात्र त्यावेळी तीन कारणांमुळे भांबावलेले असतात.