हा लेख छापून येईल, तेव्हा मी मुंबई-लंडन प्रवासात असणार आहे. तिकडे जाण्याचं कारण म्हणजे युरोपियन मराठी संमेलनात आम्ही आमचा ‘लाभले आम्हास भाग्य’नावाचा कार्यक्रम घेऊन जातो आहोत. ज्या देशाने आपल्यावर अनेक वर्ष राज्य केलं, त्या देशामध्ये जाऊन आपल्या लेखकांनी लिहिलेले विचार, अस्खलित मराठीमध्ये तीन-साडेतीन तास सादर करण्याची संधी कोण सोडेल!