

Mobile Usage Reduces Family Communication as Internet Access Hits 85%
sakal
Excess Mobile Usage and Internet Access Impacts Family Communication: एकविसाव्या युगाकडे जाताना, भारत आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करीत असताना, प्रत्येकाच्या जीवनात सध्याच्या 'स्मार्टफोन' (मोबाईल) जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. त्याचा थेट परिणाम आता महाराष्ट्रातील कुटुंब संस्थेवर दिसत आहे. घरात एकत्र बसून संवाद साधण्याऐवजी प्रत्येक जण मोबाईल स्क्रीनमध्ये गुंतलेला असल्याचे चित्र राज्यभरात दिसत आहे. बहुतांश जिल्ह्यांत ८५ ते ९५ टक्क्यांपर्यंत मोबाईल व इंटरनेट उपलब्धता आहे. मुंबई, पुणे, नागपूरसारख्या जिल्ह्यांत ही टक्केवारी ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मात्र, वाढत्या मोबाईल वापरामुळे कुटुंबातील प्रत्यक्ष संवाद कमी होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.