
राजीव तांबे - साहित्यिक, बालमानसविषयक तज्ज्ञ
‘आपल्या घरात आपलं काम’ हे सूत्र घरात पाळलं गेलं पाहिजे. तसं नसेल तर, घरातला केरकचरा काढणं, भाजी निवडणं, घासलेली ओली भांडी पुसून जागेवर ठेवणं, कपड्यांच्या घड्या करणं, घर आवरणं अशी कामं करणं म्हणजे ‘आईला मदत करणं’ असा चुकीचा संदेश घरात दिला जातो. असा चुकीचा संदेश देण्याचं कारण, ‘ही कामं फक्त आईचीच आहेत’ असं चुकीचं गृहितक आहे. हे घर आपलं असल्यानं घरातील सर्व कामंसुद्धा आपलीच आहेत आणि ती सगळ्यांनी मिळूनच करायची आहेत. म्हणूनच अमुक कामं फक्त आईची आणि तमुक फक्त बाबांची आणि मदत करायची मुलांनी असं नव्हे.