कधी कधी काही माणसांचा आपल्या आयुष्यावर इतका प्रभाव असतो, की ती माणसं निघून गेल्यावर एक कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण होते... माझी आणि त्यांची मैत्रीही अशीच... त्यांच्या जाण्याने मी माझा ‘सॅंटा’ गमावला...
ही गोष्ट २००६ मधली. मी बीएमएमच्या दुसऱ्या वर्षाला असताना प्रभात चित्र मंडळातर्फे काही निवडक मुलांना माटुंग्याच्या रुईया कॅालेजला एका चित्रपट महोत्सवासाठी नेलं होतं. सकाळी लवकर घर सोडलं होतं, त्यामुळे झोप अनावर झाली होती.