आता शाळा सुरू झाल्या म्हणजे, घराघरातील वातावरण बदलायला सुरुवात होतं. त्या-त्या घराच्या संस्कृतीप्रमाणे घराघरात ‘शिस्तीचे वारे, आरडाओरडीचा गडगडाट, अभ्यासाची चक्रीवादळं आणि परीक्षेच्या त्सुनामीची भीती’ असं सारं गरगरू लागतं. या सगळ्याचा केंद्रबिंदू असतो अभ्यास आणि परीक्षा. गंमत म्हणजे या केंद्रबिंदूला मात्र अनेक केंद्रं असतात, म्हणून आपण या केंद्रांचाच वेध घेऊ.