

सायली शिंदे - योगतज्ज्ञ
‘वयात येणं’ हा मुलींच्या जीवनातील एक नैसर्गिक आणि महत्त्वाचा टप्पा असतो. शरीरात आणि मनात अनेक बदल सुरू होतात - हार्मोन्स सक्रिय होतात, मासिक पाळी सुरू होते, भावना अनिश्चित होतात, आणि यासोबतच शरीरावर व चेहऱ्यावरही बदल जाणवू लागतात. कधी पाळी अनियमितही होते. याच टप्प्यावर योगसाधना आणि संतुलित आहार मुलींसाठी उपयुक्त ठरतो.