- शलाका तांबे, लेखिका, लाइफ कोच, समुपदेशक
आपण सर्व जण दिवसभर विचारांच्या गर्दीत वावरत असतो. डोळे उघडताच सुरू होणाऱ्या विचारांची रेलचेल रात्री डोळे मिटेपर्यंत सुरूच असते. ‘आज काय करायचं?’, ‘काल मी ते का केलं?’, ‘उद्या काय होईल?’, ‘लोक काय म्हणतील?’ असे असंख्य विचार आपल्या मनात पार्श्वभूमीवर सतत चालू असतात.