
छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ म्हणजे मराठ्यांच्या शौर्याचा आणि संस्कृतीचा सुवर्णकाळ. या काळातील अनेक गोष्टी आजही आपल्याला उत्सुकता निर्माण करतात. त्यापैकी एक म्हणजे त्याकाळी लोकांचा आहार आणि त्यात वापरले जाणारे मसाले. आज आपण मिरचीच्या स्वयंपाकातील स्थानाबद्दल बोलतो, पण शिवाजी महाराजांच्या काळात मिरची भारतात होतीच नाही! मग प्रश्न पडतो, जेवणाला तो झणझणीतपणा यायचा कशाने? वरिष्ठ पत्रकार अभिजीत घोरपडे यांनी 'भववाल' या यूट्यूब चॅनलवर याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. चला, या रंजक इतिहासाचा शोध घेऊया.