

राजीव तांबे - साहित्यिक, बालमानसविषयक तज्ज्ञ
अगदी दोन दिवसापूर्वीची ही गोष्ट. मी माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो आणि अचानक बाजूच्या घरातून पालकांचा आरडाओरडा ऐकू येऊ लागला. नंतर पालकांचा आवाज चढत्या क्रमानं चढत जाऊ लागला आणि नंतर अर्थातच मुलाचं किंचाळणं. ओह! याचा अर्थ हे युद्ध दोन पालकांतील नसून, ‘सुसंस्कारी’ पालक आणि ‘कुसंस्कारी’ मुलगा यातलं आहे! मी बेचैन झालो. मी मित्राला म्हणालो, ‘‘मी जाऊ का तुमच्या शेजाऱ्यांकडे? तो मुलगा अडचणीत आहे, असं वाटतंय. त्याच्या मदतीला आपण गेलं पाहिजे, नाहीतर ते सुसंस्कारी पालक एखादवेळेस त्या मुलाला मारतील, बडवतील.’’