
अश्विनी आपटे- खुर्जेकर
मैत्रिणींनो, तुम्ही हे कधी अनुभवलंय का, की तुम्ही अगदी मनापासून चांगुलपणानं कोणालातरी काहीतरी सांगायला गेलात; पण त्यातून गैरसमजच निर्माण झाले. एखादा प्रश्न विचारताना आपल्या बोलण्याच्या स्वराला थोडीशी धार आली, तर त्यामुळे आपण चिडून बोलतोय अथवा आपण समोरच्याला दोष देतोय असं समोरच्याला वाटतं. एखादी गोष्ट ठामपणे सांगितली, तर लोकांना ती आपल्या बोलण्यातली आक्रमकता वाटते. कधी गैरसमज होऊ नये म्हणून आपण सौम्य आणि संयम आणि बोललो, तर ती लोकांना उदासीनता वाटू शकते...पण म्हणजे नक्की काय चुकतंय?