सोशल मीडियावरचे प्रसिद्ध कपल 'प्रसिका'ला का नकोय मूल?

अनेक लोकांनी त्यांना स्वार्थी म्हटले आहे
prasad-deepika
prasad-deepikagoogle
Summary

सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या प्रसाद आणि दीपिका या जोडप्याने मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अनेक लोकांनी त्यांना स्वार्थी म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे हे कपल १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च करणार आहे.

आपल्या समाजात नेहमीच कोणाना कोणाविषयी पूर्वग्रह असायचा शिवाय आव्हानेही होती. पण आता बराच फरक पडला आहे. लोकं (People) त्यांच्या इच्छेनुसार वागत आहेत. सोशल मीडियाच्या (Social Media) वापरामुळे लोकांचा दृष्टीकोन खूप बदलला आहे. लोकं थेट कमेंट करून आपला राग-प्रेम व्यक्त करतात. सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या प्रसाद आणि दीपिका (Prasad-Deepika) या जोडप्याबाबतीत असेच घडले आहे. ते 'प्रसिका' नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचे फॉलोअर्स प्रचंड प्रमाणात आहेत. त्यांनी मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाविषयी चाहत्यांकडून त्यांना सतत प्रश्न विचारले जात आहेत.

prasad-deepika
तिशीच्या आत लग्न कराल तर फायद्यात राहाल, वाचा ५ फायदे

का घेतला निर्णय ( Why Took This Decision?)

काहींनी प्रसिकाला स्वार्थी असे म्हटले आहे. असे असूनही त्यांनी चाईल्ड फ्री असणे ही त्यांच्यासाठी खूप कठीण आणि महत्त्वाची गोष्ट असल्याचे म्हटले आहे.. स्वतःचे मूल होऊ देण्यापेक्षा या जोडप्याला नाथ मुलींची काळजी घेणे आणि त्यांची काळजी घेणे ही जबाबदारी असल्याचे वाटते. त्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे. त्याप्रमाणे त्यांनी चार मुलींची आर्थिक जबाबदारी स्वीकारली आहे. आणखी अशा अनाथ मुलांची जबाबदारी स्विकारण्यासाठी ते तयार असून शिक्षण आणि उत्तम आयुष्य देण्यासाठी 100 अनाथ मुलींची आर्थिक जबाबदारी उचलण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. मुलं आवडत नाहीत म्हणून चाईल्ड फ्री राहण्याचा विचार केला या म्हणण्याला ते विरोध करतात. उलट त्यांचे मुलांवर प्रेम आहे.

prasad-deepika
पालकांनो, तुमच्या अल्पवयीन मुलांना किती स्वातंत्र्य द्याल?

हा निर्णय विवादास्पद का? (Is their decision controversial?)

भारतातील वाढती लोकसंख्या, पर्यावरणाचा प्रश्न, इतर अनेक समस्या बघता अनेक लोकं आता मुलांना जन्म न देण्याचा अर्थात चाइल्ड फ्री राहण्याचा विचार करत आहेत. भारतात हे पाऊल नवे असले तरी अनेक कपल्स गांभिर्याने याकडे लक्ष देत आहेत. जेव्हा तुम्ही सर्व बाजूनी खूप सक्षम असता तेव्हा पालकत्वाचा विचार करता. पण असा चाईल्ड फ्री राहण्यासाठी विशेषत: मातृत्वाचा त्याग करण्यासाठी धैर्याची आवश्यकता असते. ज्या देशात नवविवाहित जोडप्यांना 'गुड न्यूज कधी मिळणार?' असा प्रश्‍न नातेवाईक सतत विचारून भेडसावत असतात, त्या देशात दुसऱ्या मुलांना शिक्षण आणि सर्वोत्तम जीवन देण्यासाठी प्रयत्न करणारी 'प्रसिका'सारखी जबाबदार जोडपी असणे महत्वाचे वाटते.

prasad-deepika
लग्नानंतरची दोन वर्षे का महत्वाची! ही तीन कारणे वाचाच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com