नवी दिल्ली : ‘‘लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करीत असताना सर्वप्रथम टपालाने आलेल्या मतांची (पोस्टल बॅलेट्स) मोजणी केली जावी,’’ अशी मागणी ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी रविवारी निवडणूक आयोगाकडे केली. आघाडीच्या एका शिष्टमंडळाने यासंदर्भात निवडणूक आयुक्तांची भेट घेतली.
‘‘गेल्या काही काळात आम्ही तिसऱ्यांदा निवडणूक आयोगात आलो आहोत. टपालाने आलेली मते ही निकालात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे ‘पोस्टल बॅलेट’ची सर्वप्रथम मोजणी केली जावी, हा निवडणूक आयोगाचा नियम होता.
त्यामुळे चार तारखेला निकालादरम्यान या मतांची आधी मोजणी केली जावी,’’ अशी मागणी करण्यात आल्याचे काँग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. कडक देखरेखीखाली मतमोजणी करावी, असा मुद्दा आयोगासमोर मांडण्यात आला असल्याचे काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांना नमूद केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.