भिंड : ‘‘गरीब, दलित, ओबीसी आणि अनुसूचित जाती-जमातींना त्यांचा हक्क मिळवून देणारी राज्यघटना, भाजप पुन्हा सत्तेत आल्यास फाडून फेकून देईल,’’ असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी मध्य प्रदेशातील भिंड येथे घेण्यात आलेल्या सभेत केला.
राहुल गांधी यांनी या सभेदरम्यान, राज्यघटनेची प्रतही आणली होती. ती प्रत दाखवत राहुल म्हणाले की, यंदाची निवडणूक ही सामान्य नसून दोन विचाधारांमधील ही लढाई आहे. ‘‘राज्य घटनेमुळेच गरीब, ओबीसी, आदिवासी आणि अनुसूचित जातींमधील व्यक्तींना मनरेगासारखी योजना, जमिनीचे हक्क, आरक्षण आणि अन्य गोष्टी मिळाल्या आहेत.’’ मात्र भाजप पुन्हा सत्तेत आल्यास गृहमंत्री अमित शहा आणि त्यांच्या खासदारांचा राज्यघटना फाडून फेकून देण्याचा मानस आहे. केवळ २०-२५ उद्योगपतींनी हा देश चालवावा अशी भाजपची इच्छा, असा दावा राहुल यांनी केला आहे.
आरक्षणावरूनही हल्लाबोल
राहुल गांधी यांनी आरक्षणावरूनही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. सत्ताधारी पक्ष दावा करत आहे की, ते आरक्षणाविरोधात नाहीत, पण असे असेल तर त्यांनी रेल्वे आणि त्यासारख्या अन्य सार्वाजनिक उद्योगधंद्यांचे खासगीकरण का सुरू केले आहे, असा सवाल राहुल यांनी उपस्थित केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले तर ते २२-२५ उद्योगपतींना अब्जाधीश बनवतील; पण काँग्रेस सत्तेत आल्यास कोट्यवधी महिलांना लखपती बनवेल.
-राहुल गांधी, काँग्रेसचे नेते
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.