लोकसभा 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या उत्तर प्रदेशात आहेत. तेथे काही ठिकाणी त्यांच्या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अमरोहा आणि सहारनपुर येथे आयोजित सभेत मोदींनी विरोधकांवर टिकेची तोफ डागली. उत्तर प्रदेशातील सहारनपुर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहिर सभा आज (ता. 5) आयोजित करण्यात आली होती. 'ही निवडणूक भारताचे भविष्य ठरवेल,' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य केले. त्यासोबतच त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला. या सभांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रिय मंत्री स्मृती इराणी व भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. काय बोलले पंतप्रधान मोदी पाहुया...
याशिवाय मोदींनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचीही आठवण केली. 'राजीव गांधी यांनी संसदेत मंडल कमीशनचा विरोध केला होता. काँग्रेसला ओबीसी कमीशनवरही आक्षेप आहे,' असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. काँग्रेस ही महामिलावटी आहे अशी टिका करत मोदींनी देशाच्या युवांचे स्वप्न आणि आकांक्षा यांच्या पुर्ततेचे आश्वासन दिले. भारतीय सेनेचे मनोबल वाढेल असेच आमचे प्रयत्न राहील असे म्हणत मोदी यांनी हिंसे ऐवजी देशात शांती राहील यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील राहील, असा विश्वास व्यक्त केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.