Loksabha 2019 : लोकसभा निवडणुकीत भाकरी फिरवा - आढाव

Baba-Adhav
Baba-Adhav

पुणे - भुसार बाजारात हमाल पंचायत संचालित शिदोरीगृहांसाठी सवलतीच्या दरात मिळणारा अन्नधान्य पुरवठा राज्य सरकारने बंद केल्यामुळे तेथील कष्टकरी सामान्य जनतेचा उपजीविकेचा प्रश्‍न अधिकच बिकट झाला आहे.

केवळ हेच नव्हे तर नरेंद्र मोदी यांच्या गेल्या पाच वर्षांच्या कारभाराचे चटके अंगमेहनती कष्टकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेलाच अधिक बसले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत भाकरी फिरवा, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी केले. 

आढाव म्हणाले, ‘‘राज्य सरकारने खुल्या बाजारातील सवलतीच्या दरात मिळणारा अन्नधान्य पुरवठा बंद केला. इलेक्‍ट्रॉनिक वजनकाट्यावर तोलाई बंद केल्यामुळे भुसार बाजारातील तोलणारांवर उपासमारीची वेळ आली. हमाल माथाडी कामगारांना व्यापाऱ्यांनी काम देणे बंद केले, याबाबत पालकमंत्री गिरीश बापट आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याशी चर्चा केली. मात्र, त्यांनी यावर कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. त्यांच्या या भूमिकेमुळे खुल्या बाजारातील असंघटित क्षेत्रातील अनेक कामगारांच्या रोजगाराचा आणि उपजीविकेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.’’ कष्टकरी, शेतकरी विरोधातील कायदे, अल्पसंख्याकांना भेदभावाची वागणूक, महिलांवरील वाढते अत्याचार, शेतकरी कामगारांच्या विरोधातील कायदे करून सर्वसामान्य जनता विरोधी भूमिका सरकारने घेतली आहे. यामुळे सरकारच्या विरोधात मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com