नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान आज (रविवार) पार पडले. या टप्प्यात देशातील 59 जागांसाठी मतदान घेण्यात आले असून, 979 उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले. सहाव्या टप्प्यात सायंकाळी सहापर्यंत सरासरी 59.80 टक्के मतदान झाले.
पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 80.16 टक्के मतदान झाले तर उत्तर प्रदेशात सर्वांत कमी 50.96 टक्के मतदान झाले. तसेच राजधानी दिल्लीत 55.44 टक्के, मध्य प्रदेशमध्ये 60.12, हरियाणात 62.14 टक्के, बिहारमध्ये 55.04 टक्के, तर झारखंडमध्ये 64.46 टक्के मतदान झाले.
मोदी सरकारमधील नरेंद्रसिंह तोमर (मुरैना, मध्य प्रदेश), मेनका गांधी (सुलतानपूर, उत्तर प्रदेश), राधामोहनसिंह (पश्चिम चंपारण्य, बिहार), डॉ. हर्ष वर्धन (चांदणी चौक, दिल्ली) या चार विद्यमान मंत्र्यांसह अनेक उमेदवारांना 23 मेनंतर जनतेचा कौल समजणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.