Loksabha 2019 : 'मोदींमुळे देश झाला उद्ध्वस्त'

Loksabha 2019 : 'मोदींमुळे देश झाला उद्ध्वस्त'

पटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रोज 20 तास काम करत आहेत. त्यामुळे देश उद्ध्वस्त झाला आहे, अशा शब्दांत बिहारमधील बेगुसराय लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कन्हैयाकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले. कन्हैयाकुमार यांनी ही टीका ट्विटरवरून केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि भाजपवर विरोधकांकडून विविध मुद्यांवर टीका केली जात आहे. असे असताना आता कन्हैयाकुमार यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, ''एअर इंडिया, बीएसएनएल, एचएएलनंतर आता भारतीय टपाल खात्याचीही परिस्थिती बिकट झाली आहे. टपाल खात्याला 15 हजार कोटींचा तोटा झाला आहे. देश उगच नाही उद्ध्वस्त होत आहे. 'चौकीदार'साहेब यासाठी रोज 20 तास काम करत आहेत. तेही कोणतीही सुट्टी न घेता''.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच समोर भारतीय टपाल खाते मोठ्या आर्थिक संकटात असून, तोटा सहन करावा लागत आहे. या कंपनीच्या तोट्याची आकडेवारी ही बीएसएनएल आणि एअर इंडियाच्या तोट्याच्या आकड्याहून अधिक आहे, अशी माहिती समोर आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com