Wari 2019 : दर्याच्या मच्छीमारांची वैराग्याची वारी

Wari
Wari

वाखरी (जि. सोलापूर) - वर्षभर समुद्रात मासेमारी करणारे मच्छीमारही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या मागे पंढरीची पायी वारी करतात. तेही अवघ्या दहा दिवसांत. हरिनामात दंग होत हे वारकरी दररोज सुमारे ३५ ते ४० किलोमीटरचे अंतर पायी पार करतात. मच्छीमारांची ही दिंडी जणू वैराग्याची वारी करीत असते. आळंदीतील प्रस्थानानंतर सहा दिवसांनंतर निघालेल्या अर्नाळा कोळीवाडा मच्छीमार दिंडीने मजल दरमजल करीत वाखरीत माउलींचा पालखी सोहळा गाठला. 

पंढरीच्या आनंदवारीत आपणही सहभागी व्हावे, या उद्देशाने दादामहाराज जोशी यांच्या प्रेरणेने आणि मोरेश्वर वैती यांच्या नेतृत्वाखाली अर्नाळा कोळीवाडा मच्छीमार दिंडीने पंढरीच्या वारीस सुरवात केली. यंदा अर्नाळा वारकरी मंडळाच्या दिंडीतील वारकऱ्यांची संख्या शंभर आहे. 

एक जून ते ३१ जुलै या दोन महिन्यांच्या काळात समुद्रात मच्छीमारी करण्यास बंदी असते. व्यावसायिक अडचणींमुळे मच्छीमारांना वारीत माउलींच्या पालखी सोहळ्यासमवेत अठरा दिवस देणे शक्‍य होत नाही. माउलींची पालखी लोणंदमध्ये असताना या मच्छीमार दिंडीने आळंदीत समाधीचे दर्शन घेऊन आपली पायी वारी सुरू केली. आळंदी निघून दिवेघाट, सासवड (देशमुखवाडी), नीरा, फलटण, बरड, नातेपुते, वेळापूर, असे मुक्काम करीत वाखरीत माउलींच्या सोहळ्याला गाठतात. हे मच्छीमार माउलींच्या पालखीच्या ओढीने हे अंतर पार करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com