पंढरपूर - सह्याद्रीच्या घाट माथ्यावर काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे. शनिवारी सायंकाळी उजनी धरण ७५ टक्क्यांहून अधिक भरले आहे..प्रशासनाने पूरनियंत्रणासाठी धरणातून भीमा नदी पात्रात २१ हजार ६०० क्युसेक इतका विसर्ग सोडला आहे. कालव्यातून ५०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने भीमा नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे. पंढरपुरात चंद्रभागा नदी प्रवाहित झाली आहे..आषाढी यात्रा अगदी तोंडावर आली आहे. अशातच उजनी धरणात १०४ टीएमसी एवढा पाणी साठा झाला आहे. सध्या दौंड येथून उजनीमध्ये २७ हजार ४५६ क्युसेक विसर्ग आवक होत आहे. आणखी पाऊस झाला तर भीमा नदीला पूर येण्याची शक्यता आहे..आषाढी वारीत चंद्रभागा वाळवंट रिकामे ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पंढरपुरातील चंद्रभागेच्या पात्रात पाणी पातळी वाढली आहे. चंद्रभागेच्या पाण्यामध्ये कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी जीव रक्षक तैनात करण्यात आले आहेत. नदीपात्रामध्ये नौकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.