मुंबई - राज्याच्या ग्रामीण भागात मागील वर्षभरात सात लाख लोकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद झाली आहे. मात्र ही नोंद राज्यातील ग्रामीण रुग्णालये, जिल्हा आरोग्य विभाग यांच्याकडील आहे. यात महापालिका, नगरपालिका आणि खासगी रुग्णालयातील घटनांची नोंद नाही.