धक्‍कादायक ! हातावरील पोट असलेल्या 80 लाख विद्यार्थ्यांच्या पालकांकडे नाहीत मोबाइल; ऑनलाइन टिचिंगसाठी पंतप्रधानांना पत्र

mobile logo
mobile logo
Updated on

सोलापूर : राज्यात पहिली ते बारावीपर्यंतच्या तब्बल दोन कोटी मुलांपैकी 80 लाख विद्यार्थ्यांच्या पालकांकडे ऍन्ड्राईड मोबाइल नसल्याचे शिक्षण विभागातील सर्व्हेत स्पष्ट झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन काळात 100 टक्‍के विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचावे, यासाठी केंद्र सरकारने दूरदर्शनवरील आठ चॅनल व आकाशवाणीचा वेळ द्यावा, असे स्मरणपत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. मात्र, त्यांच्याकडून काहीच उत्तर आलेले नाही. 


सततचा दुष्काळ अन्‌ पाचवीला पुजलेली नापिकी, शेतमालास हमीभाव नाही, शासकीय योजनांचा लाभ तथा अनुदान वेळेत मिळत नाही. विदर्भ, मराठवाड्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर व पुण्यातील काही जिल्ह्यांत नेटर्वकचा नेहमी प्रोब्लेम येतो. तर हातावरील पोट असलेल्या पालकांकडे साधे मोबाइल आहेत, तर बहूतांश पालकांकडे मोबाईलच नाहीत. त्यामुळे अशा मुलांची शिक्षणाची गोडी निर्माण करणे, त्यांना शालेय प्रवाहाबाहेर जाऊ न देण्याचे आव्हान, शिक्षण विभागापुढे उभे राहिला आहे. या पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन टिचिंगसाठी केंद्राने दूरदर्शन व आकाशवाणी उपलब्ध करुन द्यावेत, अशी अपेक्षा शालेय शिक्षणमंत्र्यांनी व्यक्‍त केली. तत्पूर्वी, 15 जूनपासून व्हॉट्‌सअपद्वारे ननवी, दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे. 


ठळक बाबी... 

  • दोन कोटींपैकी 60 टक्‍केच मुलांच्या पालकांकडेच आहेत ऍन्ड्राईड मोबाइल 
  •  
  • राज्यातील 95 टक्‍के विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविली शालेय पुस्तके: दहावी-बारावीच्याच अभ्यासक्रमाला कात्री 
     
  • प्रतिबंधित क्षेत्रातील शिक्षकांना लागली वेतनाची चिंता : ऑनलाइन टिचिंगच्या प्रवाहापासून दूर असलेल्यांच्या वेतनाबाबतही प्रश्‍नचिन्ह 
  •  
  • केंद्र सरकारकडून दूरदर्शवरील काही चॅनेल व आकाशवाणीचा वेळ उपलब्ध व्हावा: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना अपेक्षा 
  • खासगी शाळांकडून ऑनलाइन टिचिंगसाठी वेगळे शुल्क: शालेय फीसंदर्भात राज्यातील पालकांकडून तक्रारींचा ढिगारा  

कोरोना काळात राज्याला केंद्राकडून सहकार्याची अपेक्षा 


कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेत शालेय शिक्षण विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. दोन कोटींपैकी सुमारे 40 टक्‍के मुलांच्या पालकांकडे ऍन्ड्राइड मोबाइल नसल्याने त्यांच्यापर्यंत सहजासहजी शिक्षण पोहचावे म्हणून दूरदर्शन व आकाशवाणीची गरज आहे. त्यामुळे पंतप्रधानांना दोनवेळा पत्रव्यवहार करुनही काहीच उत्तर आलेले नाही. 
- वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com