
नागपूर : कृषी विस्तार कार्यातील अपयशाबाबत कृषी विभागाला दोषी धरले जात असताना याच खात्यात गेल्या काही वर्षांपासून नऊ हजार पदांचा अनुशेष असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या बाबत कोणीच गंभीर नसल्याने ही पदे केव्हा भरली जातील या बाबत देखील अनिश्चितता आहे. या संदर्भात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, आयुक्त सूरज मांढरे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.