
मुंबई : कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी येत्या दोन वर्षांत ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याने शेतीच्या आधुनिकीकरणाला चालना मिळणार आहे. दरम्यान, राज्यात बारामती ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून सध्या ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता वापराचा प्रयोग यशस्वीपणे राबविला जात आहे. या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी सरकारचा हातभार लागण्याची शक्यता आहे.