

नवी दिल्ली - ‘राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली असून तीच अधिकृत भूमिका आहे,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले. फडणवीस आणि मुंडे दोघेही दिल्लीत होते. मुंडे मंत्रिपद वाचविण्यासाठी दिल्लीत आल्याची चर्चा होती.